आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज : ध्येय - विश्वास - यश

आज प्रत्येकासाठी सगळे आकाश खुले आहे. जगभरातील संधी उपलब्ध आहेत. फक्त त्याचे सोने करण्यासाठी तुमच्याकडे हिंमत, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम करण्याची तयारी असायला हवी. एवढी पुंजी असली, की माणूस स्वत:च्या ताकदीवर उद्योगविश्व निर्माण करू शकतो. ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कं पनीज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनोहर जगताप यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि कष्टातून उभे केलेले उद्योगविश्व पाहिले, की माणसामधील असामान्य गुणवत्तेची आणि जिद्दीची प्रचिती येते. आज ‘आर्यन्स समूह’ मनोरंजन आणि माध्यमे, ऊर्जा, पोलाद, माहिती-तंत्रज्ञान, बांधकाम, पायाभूत सुविधा, आरोग्य, औषध निर्मिती, शिक्षण, आयात-निर्यात अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करीत आहे. त्यांच्या या वाटचालीचा मागोवा...

‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चे सीईओ आणि संस्थापक मनोहर जगताप यांनी २००८ मध्ये ‘मायबोली’ या मराठी मनोरंजन वाहिनीच्या रूपात उद्योगविश्वात पदार्पण केले. कोणताही अनुभव नसताना आणि कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी हे धाडस केले. यानंतर पुढील बराच काळ ‘मायबोली मराठी वाहिनी’ उभी करण्यासाठी ते अथक परिश्रम करीत राहिले. बऱ्याचदा अपयश पदरी पडले, मात्र त्यामुळे ते खचून गेले नाहीत, तर आणखी जिद्दीने आणि चिकाटीने काम करीत राहिले. डोक्यात अनेक संकल्पना ठेवून त्यांनी उद्योगविश्व उभारण्याचे स्वप्न पाहिले. याला अनुसरून त्यांनी पुन्हा आपल्या प्रयत्नांना जोर देऊन भारतात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी धडपड सुरू केली. आता स्वप्न फक्त एका मराठी वाहिनीपुरते मर्यादित न राहता एक औद्योगिक विश्व तयार करण्याचे होते.

एका बाजूला भारतात परकीय गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी अनेक क्षेत्रांत आपल्या व्यवसायाची बीजे रोवण्यास सुरुवात केली. यादरम्यान अनेक कारणांमुळे सहन करावी लागणारी पीछेहाट आणि आर्थिक ताणाच्या प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले.

मुख्यमंत्री साहाय्यता निधी व पोलिस रिलीफ फंड यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले

२०१९ मध्ये ‘स्वरंग’ ही मराठी मनोरंजन वाहिनी आणि ‘न्यूज अन्कट’ ही वृत्तवाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या या दोन्ही वाहिन्या डिजिटल स्वरूपात सुरू आहेत. लवकरच त्या सॅटेलाईटवर येणार आहेत. ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चे २००८ मध्ये लावलेले हे रोपटे आज मोठा वटवृक्ष झाला आहे. ज्याच्या सावलीत आज अनेक उद्योग व्यवसाय व रोजगार निर्माण होत आहेत. इतकेच नाही, तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला सर्वात मोठी गुंतवणूक ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ घेऊन येत आहे. यासाठी गेली अनेक वर्षे ते परदेशातून भारतात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्नशील होते. एका बाजूला भारतात परकीय गुंतवणूक आणण्याचे काम सुरूच होते आणि त्याला आता हळूहळू यश येताना दिसत होते. वास्तवात २०१३ मध्ये त्यांनी ही गुंतवणूक भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र काही कसोशीने प्रयत्न केले. अखेर २०२३ मध्ये त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आणि सुरुवात झाली ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’च्या यशोगाथेची. आज हा उद्योग समूह अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहे. अनेक व्यवसायांमध्ये सक्रियपणे काम करीत आहे. श्री. मनोहर जगताप यांच्या प्रयत्नातून सिंगापूर आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स (बीव्हीआय) येथून ही परकीय गुंतवणूक भारतात आलेली आहे. त्यामुळे आता ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चा व्यवसाय फक्त देशापुरताच मर्यादित नसून, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारत आहे.

सामाजिक कार्य

उद्योगाबरोबरच ‘आर्यन्स ग्रुप’ने नेहमीच सामाजिक कार्यातही सक्रिय भूमिका पार पाडलेली आहे. ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी’ज ‘ओमा फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवीत आहे. ‘ओमा फाउंडेशन’च्या वतीने प्रामुख्याने कोरोना काळात अनेक रुग्णालयांना व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून देणे, कोरोना काळात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या पोलिस, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्णालयांसाठी ॲम्ब्युलन्स वाटप, वाहनचालकांना हेल्मेट वाटप, शेतकऱ्यांसाठी मोफत सौरपंप वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व अनेक संस्थांना रोख रकमेच्या स्वरूपात मदत केली आहे. काजल कांबळे या दिव्यांग गिर्यारोहिकेला दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो हा पर्वत सर करण्यासाठी लागणारा सर्व खर्च फाउंडेशनने केले होता. तसेच एक हजार रिक्षाचालक व घरकाम करणाऱ्या महिलांना मोफत विमा सुविधा ‘ओमा फाउंडेशन’ने दिलेली आहे. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुख्यमंत्री साहाय्यता निधी व पोलिस रिलीफ फंड यांना ७६ कोटी रुपयांची मदत ‘ओमा फाउंडेशन’कडून नुकतीच करण्यात आली. याव्यतिरिक्त ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ने डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्टव्हिलेजेस आणि स्मार्टसिटी तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

सर्वसामान्यांसाठी सोप्या भाषेत मांडणी केलेल्या अर्थसंकल्पाचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या हस्तेप्रकाशन करण्यात आले
‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चे संचालक मंडळ

केंद्र आणि राज्य सरकार विविध उद्योगस्नेही सुधारणा घडवून आणत असल्यान अे वजड उत्पादन उद्योग, मनोरंजन आणि माध्यम, डेजिटल मार्केटिंग, शिक्षण, औषध निर्माण, रिअल इस्ट अटे शा विविध क्षेत्रांत रोजगार संधीची नवी दारे खुली करून देण्यासाठी ‘आर्यन्स समूह’ कटिबद्ध आहे. उद्योग उभारण्यासाठी तुम्हाला आधी माणसे उभी करवी लागतात आणि मग या मनुष्यबळाकडून उद्योगाची उभारणी होत, यावर ‘आर्यन्स समूहा’चा ठाम विश्वास आहे आणि या तत्त्वानुसारच आम्ही काम करीत आहोत.

स्मिता शितोळे-जगताप,
व्यवस्थापकीय संचालिका

‘आर्यन्स’ सन्मान सोहळा

विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या मान्यवर आणि गुणवंतांचे कौतुक झाले पाहिजे, त्यांच्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे, अशीच ‘आर्यन्स ग्रुप’ची भूमिका आहे. याला अनुसरूनच ‘आर्यन्स ग्रुप’ या वर्षापासून ‘आर्यन्स सन्मान’ पुरस्काराचे आयोजन सुरू करीत आहे. या पुरस्काराद्वारे साहित्य, पत्रकारिता, मनोरंजन, वैद्यकीय, उद्योग, राजकारण यांसारख्या विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे ‘आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळा’ आयोजित केला जाणार आहे. याची सुरुवात मनोरंजन क्षेत्रापासून करण्यात येणार आहे. पहिल्याच ‘आर्यन्स सन्मान सोहळ्या’त चित्रपट, टीव्ही, नाटक या मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांच्या कामगिरीचे कौतुक करीत त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चा विविध क्षेत्रांतील विस्तार

स्वरंग मनोरंजन वाहिनी

लवकरच मराठी प्रेक्षकांसाठी ‘स्वरंग’ ही मराठी वाहिनी येत आहे. यामध्ये सर्वसामावेशक मनोरंजन कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

एजीसी क्रीडा वाहिनी

ही क्रीडा वाहिनीसुद्धा लवकरच क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येत आहे. त्यामध्ये स्थानिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वार्तांकन, क्रीडाविषयक घडामोडींची माहिती देण्यात येणार आहे. तसेच अशा खेळांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हॉस्पिटॅलिटी

महाराष्ट्रात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा पुरविण्यासाठी ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ योजना आखत आहे. खास करून कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी येथील स्थानिक व्यवसायिकांना सोबत घेऊन थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या उभारणीचे काम सुरू आहे. याबरोबरच अंतर्गत पर्यटन वाढण्यासाठी एअर कॅब सुरू करण्याची योजना आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिअल इस्टेट

महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मोठ्या प्रमाणावर बांधकाम व्यवसायात कंपनी काम करीत आहे. अनेक प्रकल्पांवर काम सुरूदेखील झाले आहे.

शिक्षण

शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचा दर्जा वाढवत विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत वेगळे स्थान देण्यासाठी कलर इंजिनीअरिंग, एरोडायनॉमिक्स इंजिनीअरिंग, ब्रॉडकास्टिंग इंजिनीअरिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतून शिक्षण दिले जाईल. प्रॅक्टिकल बेस एज्युकेशन, बॅगलेस एज्युकेशन अशा पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे नियोजन आहे.

शेती

शेतजमिनीवर जास्त पीक काढण्यासाठी होत असणारा रसायनांचा मारा यामुळे शेतजमिनी नापीक होत चालल्या आहेत. त्याचबरोबर लोकांना देखील रसायनयुक्त अन्नधान्य स्वीकारावे लागत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन कंपनी शेती क्षेत्रात ऑरगॅनिक फार्मिंगवर भर देत प्रगत शेती तंत्र वापरून या क्षेत्रात काम करणार आहे.

औषध निर्माण

भारत औषध उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर अग्रगण्य देश आहे. मात्र औषधी निर्मितीमध्ये असलेला महत्त्वाचा घटक ‘एपीआय’साठी आपण पूर्णपणे इतर देशांवर निर्भर आहोत. भारताला या क्षेत्रामध्येदेखील आत्मनिर्भर करण्यासाठी ‘एपीआय’ या महत्त्वाच्या घटकाचे उत्पादन कंपनी करीत आहे.

कचरा व्यवस्थापन

यामध्ये घनकचरा, प्लॅस्टिक आणि इतर अविघटित कचऱ्यावर प्रक्रिया करून तो पुन्हा वापरण्यायोग्य करण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कंपनी काम करीत आहे.

जैवइंधन

इथेनॉल, बायोगॅस उत्पादन करण्याचे काम कंपनी मोठ्या प्रमाणावर करणार आहे.

बॅटरी मॅन्युफॅक्चरिग

कंपनी सध्या लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन सुरू करीत आहे. याबरोबरच सिलिकॉन आयन बॅटरीवरदेखील संशोधन व विकासाचे काम सुरू केले आहे.

इलेक्ट्रिकल वेहिकल्स मॅन्युफॅक्चरिग

aaryans-group-11

एक्सर या ई-बाईकचे उत्पादन कंपनी करीत आहे. याचे उत्पादन पुण्यामध्ये होत असून, ग्राहक या ई-बाईकला पसंती देत आहेत. V 80/150, G 80/150 आणि C 80 अशी मॉडेल्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या बाईकचा वेग ताशी २५ ते ५५ किलोमीटर एवढा आहे. यातील G 150 मॉडेलचा टॉप स्पीड ताशी १०० ते १२० किलोमीटर एवढा आहे.

खाणकाम

aaryans-group-12

इल्मेनाईट, झिक्रोन, मॅग्नेटाईट, रुटाईल आणि सिलिका यांचे मायनिंग आम्ही दक्षिण आफ्रिकेत करीत आहोत. भारतात गोल्ड रिफायनरीदेखील सुरू झाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता

तंत्रज्ञानाचे भविष्य हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे. कंपनी या क्षेत्रातसुद्धा काम करीत आहे. तसेच रोबोट बनविण्याचे कामदेखील कंपनी करीत आहे.

माहिती तंत्रज्ञान

कंपनी लवकरच नवीन वेब ब्राऊझर घेऊन येत आहे. ते पूर्णतः भारतीय असेल. डेटा सेंटर, सर्च इंजिन, जे पूर्णतः भारतीय असेल अशा प्रकल्पांवर कंपनी काम करीत आहे.

सौरऊर्जा

महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कंपनी मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जेतून विद्युत निर्मिती करणार आहे. यासाठी बऱ्याच ठिकाणी कामदेखील सुरू झाले आहे.

हवाई वाहतूक

हेलिकॉप्टर आणि जेट लीज तसेच एअर कॅब सेवेसाठी कंपनी पहिल्या टप्प्यात १०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. दुसऱ्या टप्प्यात इंजिनीअरिंग कॉलेज, एरोनॉटिकल सेक्टर, एमआरओ सर्व्हिसआणि एअरलाइन्सचे कमर्शियल ऑपरेशन यासाठी अतिरिक्त ४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

हायड्रोजन फ्युएल

महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कंपनी मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जेतून विद्युत निर्मिती करणार आहे. यासाठी बऱ्याच ठिकाणी कामदेखील सुरू झाले आहे.

वित्त

यासाठी कंपनी युनायटेड स्टेट्समधील कंपनीसोबत काम करीत आहे.

रोबोटिक्स

कंपनीने ‘स्व’ रोबोट बनविला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा मानवासारखा दिसणारा असेल. याला तुम्ही तुमच्या चेहऱ्यासारखा लूकसुद्धा देऊ शकता. या सर्व आपल्या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक विकासात हातभार तर लावणार आहेच, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती देखील करणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांनी सांगितले.

सेमीकंडक्टर प्रॉडक्शन

हा महाराष्ट्रातील पहिला सेमीकंडक्टर प्रॉडक्शन प्रकल्प असेल, ज्याची आर अँड डी लॅब बनविण्याचे काम सुरू झाले असून, याचे प्रॉडक्शन देखील महाराष्ट्रात होणार आहे. यामार्फत महाराष्ट्रात १ लाख ६३ हजार कोटींची मोठी परकीय गुंतवणूक येणार आहे. ज्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. कंपनीसाठी हा प्रोजेक्ट महत्त्वाचा तर आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी देखील हा प्रोजेक्ट महत्त्वाचा असणार आहे.

अंतराळातील कचरा

हा प्रकल्प देखील कंपनीसाठी महत्त्वाकांक्षी आहे. अवकाशात जे उपग्रह सोडले जातात ते ठरावीक काळानंतर निरुपयोगी होतात. असे अनियंत्रित उपग्रह एकमेकांवर आदळून अवकाशीय कचरा म्हणजेच स्पेस डेब्रीज तयार होतो. हा अवकाशीय कचरा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुन्हा पृथ्वीवर आणण्याचे जटील काम याप्रकल्पांतर्गत केले जाणार आहे.

मराठी